Wednesday, July 18, 2018

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.16:- प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, कारण यशाचे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करणे होय, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
उस्मानाबाद तालुक्यातील माध्यमिक प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत विशेष प्राविण्य संपादीत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ, मदन बारकुल, दत्तात्रय देवळकर, अभिमन्यू शितोळे, पंचायत समिती सदस्य श्रीमती. अर्चनाताई शिन्दे, श्रीमती.चांदणे, कुसुमताई इंगळे, विराट पाटील, संजय लोखंडे, मोहन साबळे, अशिष नाईकल, बाजीराव पवार, प्रदिप शिन्दे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षणाधिकारी श्री. मोकाशे, नितीन शेरखाने  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना आमदार श्री. पाटील म्हणाले की, शिक्षणात दहावी, बारावीचा टप्पा म्हत्वाचा असून यानंतर पुढे काय करायचे यासाठी आई वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमुल्यअसल्याने त्यानुसार ध्येय निश्चित करावे. जीवनात कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांना विसरु नये. स्पर्धेच्या युगात मुलांनी यश संपादन करण्यावर लक्ष दिले पाहिजे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवले पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून 210 शाळांना डिजिटल बोर्ड , प्रत्येक वर्गात टि.व्ही.संच बसविण्यात येणार असून चांगल्या शिक्षकांचे जिल्ह्यातील अन्य शाळात या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, मोजे देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून विशेष तरतूद करण्यात आली आहे.
                विद्यार्थ्यांनी आपली क्षमता, आवड निवड ओळखून पुढचा मार्ग निवडला पाहिजे, जिल्हा परिषद शाळांची शंभर टक्के गुणवत्ता कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
                तालुक्यातील इयत्ता 12 वीच्या 8 विद्यार्थ्यांचा तर इयत्ता 10 वीच्या 265 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री.मोकासे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री.लाटे, सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment