सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश
1 कोटी 91 लाख रुपये निधीची केली होती शासनाकडे मागणी
शासनाकडून वीज बिल थकबाकी व सोलर प्लाँटचा समावेश
करण्याबाबत सुचना
उस्मानाबाद,दि.25:- तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळा,
ऐडशी या चार गावाला पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना
गेल्या तीन वर्षांपासून बंद पडली होती, ही योजना सुरू करणेसाठी जिल्हा परिषदेच्या
वतीने वारंवार प्रयत्न करण्यात येत होते, दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन
प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख निधी मागणीचा प्रस्ताव
शासनाकडे पाठविण्यात आला होता, या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तंत्रीक समितीचे बैठक झाली या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी
मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांतच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत
दिली.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या
प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत शासनाच्या वतीने माहिती
मागविण्यात आली होती, त्या अनुषंगाने दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन
प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख रुपये निधी
मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018
रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली
तांत्रीक समितीची बैठक झाली. या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी
मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करणेच्या
सुचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता
ही योजना सुरू होण्यास अंतीम मान्याता लवकरच मिळणार असल्याने चार गावातील
नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकीसह
चार गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून 2006 मध्ये चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा
योजना राबविण्यात आली तब्बल 16 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली. योजनेद्वारे
तेर ढोकी तडवळा ऐडशी आदी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. नंतर जुन 2015 ला धरणातील
पाणीसाठा संपला त्यामुळे योजना बंद पडली नंतरच्या काळात 2016 मध्ये धरणात मुबलक
प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला परंतु योजनेवरील थकीत विज बिल देयकामुळे कनेक्शन
तोडण्यात आली नंतर योजना पाणी असताना देखील योजना सुरू झाली नाही, दि. 16 मे रोजी
शासनाने एक परिपत्रक काढले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सार्वजणीक
पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत त्यामुळे योजना
बंद पडत आहेत त्यामुळे या देयका वरील 50 टक्के रक्कम व वीज माफ करून स्थानिक
स्वराज्य संस्थाला मिळणाऱ्या 14 व्या वित आयोगाच्या निधीतून थकीत वीज बिल
भरण्याची परवानगी देण्यात आली. नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला चार
गावाला मिळणारा 14 व्या वित आयोगाच्या निधीतून ऊर्जा विभागाला 50 टक्के विज बिलाचे
थकीत रक्कम वर्ग करून घेण्यात यावे असे पत्र पाठवून दिले व दि.4 ऑगस्ट 2018 ला चार
गावातील पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी साठी (नविन जलकुंभ बांधकाम करणे, नविन वॉल्ह टाकणे, नविन पाईपलाइन टाकण्या साठी असे
विविध कामांसाठी 1 कोटी 91 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागांकडे जिल्हा परिषदेच्या वतीने पाठवण्यात
आला होता. या संदर्भात दि. 8 आक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत ही
योजना सुरू करण्यात तुर्तास मान्यता दिली आहे या अनुषंगाने सुधारीत प्रस्ताव सादर
करण्याचे सुचनाही दिल्या आहेत.
"बैठकीत झालेल्या चर्चे व घेण्यात आलेली निर्णय"
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत परिशिष्ट ब
मध्ये समाविष्ट केलेल्या 83 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी पुनरूज्जिवीत
करावयाच्या योजनांचा व समाविष्ट नाहीत मात्र पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे
अशा सर्व योजनांचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीसमोर
सादरीकरण करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी व चार गाव प्रादेशिक नळ
पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत खालील अटींच्या अधीन राहून मंजुरी
देण्यात आली - प्रस्तावित योजनेत समाविष्ट सर्व गावातील लाभार्थ्यांकडुन
हमीपत्र घेण्यात यावे, हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या गावाने पाणी घेण्यासाठी नकार दिला तरी त्यांच्या
कडून 75 टक्के पाणी पट्टी वसुल करण्यात यावी. याबाबत ग्रामस्थांना निविदा
प्रक्रिया करण्या आगोदरच कल्पना देण्यात यावी, सदरील
योजनांवर सोलार पॅलेटचा व बल्क मीटारचा समावेश करण्यात
यावा, योजनेच्या अंदाजपत्रकात MSEB च्या
थकीत वीज बिलाचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने
सादर करण्यात यावे, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आल्या
आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संदर्भात बैठकीत योजना सुरू करणेसाठी अखेरचे
मान्यता मिळणार आहे.
ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी
शासनाकडून तुर्तास मान्यता मिळाली आहे. सुधारीत अंदाजपत्रक यामध्ये 1 कोटी 54 लक्ष
रूपयांचे सोलार पॅलेटचा व बल्क मीटरचा समावेश करण्यात आला तसेच MSEB चे थकीत विज बिल 88.21 लक्ष असे नव्याने
समावेश करण्यात आला आहे. पुर्वीचा व आताचा असा मिळून चार कोटी 43 लक्ष रुपयेची
सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांतच पाणी पुरवठा
योजना सुरू करण्यासाठी अखेरची मान्यता मिळेल. यामुळे मुख्यता वीज बिलामुळे बंद
पडलेली पाणी पुरवठा योजना सुधारित धोरणामुळे कार्यान्वयीत होणार आहे.
*****