उस्मानाबाद.दि.24:- जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून
30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त
करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील
यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ.
अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भौगोलीक परिस्थीतीचा विचार करुन माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी
पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधले
होते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तसेच जिल्ह्यातून एकही मोठी नदी
जात नसल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे 1022 बंधारे, 513 पाझर तलाव व 126 साठवण
तलाव बांधले होते. जलसंवर्धनाचे महत्व लक्षात घेवून जलयुक्त शिवार करण्यासाठी त्यावेळीच
डॉ. साहेबांच्या दुरदृष्टी नेतृत्वाने कामे पूर्ण केली होती. परंतु त्यावेळी लोकांना
याचे महत्व न कळल्यामुळे या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. हे
बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदे मार्फत याचा दोन अभियंत्यामार्फत सर्व्हे
करण्यात आला व यासाठी करावयाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला व त्यानुसार
निधी उपलब्ध करावा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण
मंत्री राम शिंदे यांच्या कडे निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीच्या
उपलब्धतेमुळे कोल्हापूरी बंधाऱ्याची स्थापत्य दुरुस्ती, गेट दुरुस्ती व नवीन गेट
खरेदी आदी कामे करण्यात येणार असून यामुळे 96 हजार 874 स.घ.मी. इतका पाणीसाठा पुनर्स्थापित
होऊन सुमारे 30 हजार 112 हेक्टर इतके क्षेत्र सिंचन पुनर्स्थापित होणार आहे.
जिल्ह्यातील ही मोलाची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी पूर्ण क्षमतेने उपयोगात
नव्हती. यातील बहुतांश बंधारे किरकोळ दुरुस्तीमुळे वापरात नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यांची
आजची किंमत गृहीत धरल्यास शासनाची जवळपास 250 कोटीं पेक्षा
जास्त रुपयांची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या
दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या
माध्यमातून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंधारण
मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा नियोजन
समितीच्या माध्यमातून पालकमंत्री, केंद्रीय अधिकाऱ्यांची पथके
यांच्याकडे करण्यात येत होती. विधी मंडळात देखील अनेकवेळा निधी उपलब्ध करुन देण्याची
आग्रही मागणी करण्यात आली होती.
निती आयोगाने निवडलेल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या
मार्फत बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
निती आयोगाच्या निकषाप्रमाणे कृषि व जलसंधारणाच्या निर्देशकांची पुर्तता करण्यासाठी
बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नसलेली
करोडो रुपयांची मालमत्ता उपयोगात येवून सिंचन क्षमतेत वाढ होईल. त्यामुळे
यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी
जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई
पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी
राबवावयाच्या उपाय योजनांचा विशेष कार्यक्रम 2018 अंतर्गत सिंचन
क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील
983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या
माध्यमातून रु. 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. राणाजगजितसिंह
पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जलसंधारणमंत्री
यांचे विशेष आभार मानले आहेत.
*****
No comments:
Post a Comment