Sunday, December 23, 2018

ग्रंथदिंडीने वेधले उस्मानाबादकरांचे लक्ष




उस्मानाबाद, दि.22:-  पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे कन्या प्रशाला ते वैराग्यमहामेरू संत गोरोबाकाका साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात आला. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा स्वागताध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
टाळ, मृदंगाचा गजर करणारे पथक, विविध वेशभूषातील विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय विद्यार्थ्यांनी या दिंडीत विविध जनजागृतीपर घोषणा देत सामाजिक संदेश देण्याचे काम केले. यावेळी दिंडीत संतपरंपरा, उस्मानाबाद जिल्हा दर्शन, एकता बल, स्वच्छता मिशन, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण संस्कृती, आदी संदेश देणारे चित्ररथ सामिल करण्यात आले होते. ही दिंडी जिल्हा परिषद कन्या शाळेपासून संत गाडगेबाबा चौक, काळा मारूती चौक, ताजमहल टॉकीज, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी आली. यावेळी तेथे दिंडीचा समारेाप करण्यात आला.

मन सुदृढ करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे -आमदार राणाजगजितसिंह पाटील




उस्मानाबाद, दि.22:-मन सुदृढ करायचे असेल तर साहित्य महत्वाचे आहे, जग कसे आहे, चांगले काय आहे, हे साहित्यामुळे समजते. त्यामुळे जीवनात साहित्याचे स्थान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येथे केले.
             जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्या बालकुमार साहित्य्‍ संमेलनाचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कन्या प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. यावेळी पु. . देशपांडे विचारमंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागताध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, संमेलन अध्यक्ष कु.साक्षी तिगाडे, जेष्ठ साहित्य‍िक भास्कर चंदनशिव, राजेंद्र अत्रे, माधव गरड, बालाजी इंगळे, निर्मला मठपती, कमलताई नलावडे, रमेश चिल्ले, आशा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय देवळकर, संदिप मडके, ज्ञानेश्वर गीते, अस्मिता कांबळे, उषाताई यरकळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, डायटचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख,  उपशिक्षणाधिकारी कादर शेख आदीसह सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी तसेच जिल्हयातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. 
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की,  मुलांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी त्यांना साहित्य संमेलनासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने शाळांमधूनच विद्यार्थ्यांना साहित्याचा अनुभव मिळणार आहे. साहित्य म्हणजे मनोरंजन नसून जीवन कसे चांगल्या पध्दतीने जगायचे हे साहित्य शिकवत असते.
ज्या शाळेतील मुलांची या संमेलनात निवड झाली आहे त्या शाळेला पाच हजार रुपयांचा पुस्तकांचा संच देण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
जेष्ठ साहित्यीक भास्कर चंदनशिव यावेळी म्हणाले की, सध्या संभ्रमाचे वातावरण असून माणूस माणसापासून दूरावतो आहे, अशा परिस्थितीत साहित्य  संमेलन आयोजन करणे ही काळाची गरज आहे. माणसाला माणूसकीप्रत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे साहित्य होय. साहित्य हा माणसाला माणसात आणणारा व्यवहार आहे. आई ही पहिली बालसाहित्य‍िक आहे ती लहान मुलांच्या रडण्या, बागडण्यापासून ते अंगाई गीतापर्यंत साहीत्य निर्माण करते. मुलांना व्यक्त होण्याची संधी या संमेलनामुळे मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दिव्यांगांना तालुकास्तरावर अपंग प्रमाणपत्राचे वाटप, आदीसह विविध अभिनव उपक्रम राबवून ऐतिहासीक निर्णय घेणारी राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. यापुढेही शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार असून शिक्षकांनी ही ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, तांडा, वस्ती  शाळेतील मुलांचे उपजत गुण शोधण्यासाठी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागूण शोधून त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे.  सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची ताकद साहित्यात असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गरुड झेप घ्यावी, त्याचबरोबर एखादे शिल्पचित्र  रेखाटले तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणीत अनुभव यावा, कल्पना शक्तीला फुलविण्याची ताकद साहित्यात असते.
तांडा, वस्तीवरील गरिब मुलांचे भवितव्य हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी हे साहित्य संमेलन असून बाल साहित्यातून त्यांना काय पाहिजे हे मांडता यावे यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संमेलनाध्यक्ष कुमारी साक्षी तिगाडे म्हणाली की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या बाल साहित्यातून उद़याचे कवी व लेखक घडतील. समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतील. कला कोणतीही असू द़या, तीला बाहेर येऊ द़या ती तुम्हाला मान मिळवून देईल. संमेलनातून खूप काही शिकायला मिळाले, असेही तीने सांगितले. शेतकऱ्याचे सत्य ही कविता तीने सादर केली. प्रस्तावना डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी केले. सुत्रसंचालन हणमंत पडवळ व श्रीमती संगिता वाकुरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी रोहिनी कुंभार यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Tuesday, October 30, 2018

ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून तुर्तास मान्यता



सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश
1 कोटी 91 लाख रुपये निधीची केली होती शासनाकडे मागणी
शासनाकडून वीज बिल थकबाकी व सोलर प्लाँटचा समावेश करण्याबाबत सुचना

उस्मानाबाद,दि.25:-  तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळा, ऐडशी या चार गावाला  पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद पडली होती, ही योजना सुरू करणेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वारंवार प्रयत्न करण्यात येत होते, दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  तंत्रीक समितीचे बैठक झाली या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांतच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत शासनाच्या वतीने माहिती मागविण्यात आली होती, त्या अनुषंगाने दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रीक समितीची बैठक झाली. या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करणेच्या सुचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही योजना सुरू होण्यास अंतीम मान्याता लवकरच मिळणार असल्याने चार गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
         उस्मानाबाद तालुक्यातील ढोकीसह चार गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून 2006 मध्ये चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली तब्बल 16 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली. योजनेद्वारे तेर ढोकी तडवळा ऐडशी आदी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. नंतर जुन 2015 ला धरणातील पाणीसाठा संपला त्यामुळे योजना बंद पडली नंतरच्या काळात 2016 मध्ये धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला परंतु योजनेवरील थकीत विज बिल देयकामुळे कनेक्शन तोडण्यात आली नंतर योजना पाणी असताना देखील योजना सुरू झाली नाही, दि. 16 मे रोजी शासनाने एक परिपत्रक काढले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सार्वजणीक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत त्यामुळे योजना बंद पडत आहेत त्यामुळे या देयका वरील 50 टक्के रक्कम व वीज माफ करून स्थानिक स्वराज्य संस्थाला मिळणाऱ्या 14 व्या वित आयोगाच्या निधीतून थकीत वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात आली. नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला चार गावाला मिळणारा 14 व्या वित आयोगाच्या निधीतून ऊर्जा विभागाला 50 टक्के विज बिलाचे थकीत रक्कम वर्ग करून घेण्यात यावे असे पत्र पाठवून दिले व दि.4 ऑगस्ट 2018 ला चार गावातील पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी साठी (नविन जलकुंभ बांधकाम करणे, नविन वॉल्ह टाकणे, नविन पाईपलाइन टाकण्या साठी असे विविध कामांसाठी 1 कोटी 91 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागांकडे जिल्हा परिषदेच्या वतीने पाठवण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 आक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्यात तुर्तास मान्यता दिली आहे या अनुषंगाने सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे सुचनाही दिल्या आहेत.
"बैठकीत झालेल्या चर्चे व घेण्यात आलेली निर्णय"
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट केलेल्या 83 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी पुनरूज्जिवीत  करावयाच्या योजनांचा व समाविष्ट नाहीत मात्र पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे अशा सर्व योजनांचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी व चार गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत खालील अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली - प्रस्तावित योजनेत समाविष्ट सर्व गावातील लाभार्थ्यांकडुन हमीपत्र घेण्यात यावे, हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या गावाने पाणी घेण्यासाठी नकार दिला तरी त्यांच्या कडून 75 टक्के पाणी पट्टी वसुल करण्यात यावी. याबाबत ग्रामस्थांना निविदा प्रक्रिया करण्या आगोदरच कल्पना देण्यात यावी, सदरील योजनांवर सोलार पॅलेटचा व बल्क मीटारचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या अंदाजपत्रकात MSEB च्या थकीत वीज बिलाचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावे, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संदर्भात बैठकीत योजना सुरू करणेसाठी अखेरचे मान्यता मिळणार आहे.  
ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून तुर्तास मान्यता मिळाली आहे. सुधारीत अंदाजपत्रक यामध्ये 1 कोटी 54 लक्ष रूपयांचे सोलार पॅलेटचा व बल्क मीटरचा समावेश करण्यात आला तसेच MSEB चे थकीत विज बिल 88.21 लक्ष असे नव्याने समावेश करण्यात आला आहे. पुर्वीचा व आताचा असा मिळून चार कोटी 43 लक्ष रुपयेची सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांतच पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अखेरची मान्यता मिळेल. यामुळे मुख्यता वीज बिलामुळे बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुधारित धोरणामुळे कार्यान्वयीत होणार आहे.
*****



जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूरी बंधारे दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपये मंजूर



उस्मानाबाद.दि.24:- जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भौगोलीक परिस्थीतीचा विचार करुन माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधले होते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तसेच जिल्ह्यातून एकही मोठी नदी जात नसल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे 1022 बंधारे, 513 पाझर तलाव व 126 साठवण तलाव बांधले होते. जलसंवर्धनाचे महत्व लक्षात घेवून जलयुक्त शिवार करण्यासाठी त्यावेळीच डॉ. साहेबांच्या दुरदृष्टी नेतृत्वाने कामे पूर्ण केली होती. परंतु त्यावेळी लोकांना याचे महत्व न कळल्यामुळे या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. हे बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदे मार्फत याचा दोन अभियंत्यामार्फत सर्व्हे करण्यात आला व यासाठी करावयाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला व त्यानुसार निधी उपलब्ध करावा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या कडे निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूरी बंधाऱ्याची स्थापत्य दुरुस्ती, गेट दुरुस्ती व नवीन गेट खरेदी आदी कामे करण्यात येणार असून यामुळे 96 हजार 874 स.घ.मी. इतका पाणीसाठा पुनर्स्थापित होऊन सुमारे 30 हजार 112 हेक्टर इतके क्षेत्र सिंचन पुनर्स्थापित होणार आहे.
जिल्ह्यातील ही मोलाची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी पूर्ण क्षमतेने उपयोगात नव्हती. यातील बहुतांश बंधारे किरकोळ दुरुस्तीमुळे वापरात नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यांची आजची किंमत गृहीत धरल्यास शासनाची जवळपास 250 कोटीं पेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंधारण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री, केंद्रीय अधिकाऱ्यांची पथके यांच्याकडे करण्यात येत होती. विधी मंडळात देखील अनेकवेळा निधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
निती आयोगाने निवडलेल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या मार्फत बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निती आयोगाच्या निकषाप्रमाणे कृषि व जलसंधारणाच्या निर्देशकांची पुर्तता करण्यासाठी बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नसलेली करोडो रुपयांची मालमत्ता उपयोगात येवून  सिंचन क्षमतेत वाढ होईल. त्यामुळे यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाय योजनांचा विशेष कार्यक्रम 2018 अंतर्गत सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून रु. 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जलसंधारणमंत्री यांचे विशेष आभार मानले आहेत. 
*****

Tuesday, September 25, 2018

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



उस्मानाबाद.दि.25:- जिल्हा परिषदेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.कवडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, उपशिक्षणाधिकारी श्रीमती.रोहीणी कुंभार आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                             ******

Friday, September 7, 2018

समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात -आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.5:- गावच्या विकासासाठी एकजूट व लोकसहभाग म्हत्त्वाचा असल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. 
 शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात बुधवार दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पंचायत समिती सभापती (उस्मानाबाद) बालाजी गावडे, पंचायत समिती सभापती (कळंब) दत्तात्रय साळूंके, पंचायत समिती सभापती (वाशी) श्रीमती. भाग्यश्री हाके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते, उध्दव साळवी, दत्तात्रय देवळकर, वैभव मुंढे, मदन बारकुल, महेंद्र धुरगुडे, सुरेश कोरे, उषाताई यरकळ, अस्मिता कांबळे, जयश्री खंडागळे, सुनिता जाधव, प्रविण खटाळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी (मा) शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. शिक्षकांनी मोठया प्रमाणात लोकसहभागातून शाळा सुधारल्या आहेत त्याच बरोबर गावाचा देखील कायापालट केला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात शिक्षकांची साथ महत्त्वाची आहे. लोकसहभाग गावात वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, आपण केलेल्या कामाचे मुल्यमापण व्हावे, कौतूक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून काम करावे, अशी आशा जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी व्यक्त करुन  शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील बोलतांना म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेस मधून निधीची तरतूदही करण्यात येत आहेत. डिजिटल शाळा, आरओ प्लाँट, शाळेसाठी गॅस सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बुट, सॉक्स आदी उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा जिल्हा परिषद शाळांची यावर्षी 12 हजार विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेली आहे. त्याचबरोबर क्वशन बँक तयार करुन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यावर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत वीज बिलासाठी ही जि.प.सेस मधून 89 लाख रुपयांची तरतूद आगामी जि.प.सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात येईल. शिक्षण विभागात महाराष्ट्रात अव्वलस्थानी जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.  
कांबळे अरुण नरहरी, फुलमामडी तौफी कुलआलम नुरुलअलीन, स्वामी रंजना कमलाकर, गायकवाड कमलाकर शामराव, खोसे उमेश रघुनाथ, देशमाने विजयकुमार गुरुनाथ, कांबळे तानाजी आप्पाराव, कांबळे सुब्राव गोरोबा, पखाले नामदेव भागवत, गादेकर विनोद भागवत, वाघोलीकर अभय शंकरराव, भोसले विजयकुमार बाबासाहेब, कांबळे तात्याबा बाबा, अंधारे अमोल रावसाहेब, बन बळीराम आदी 15 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अमोल अंधारे, उमेश खोसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कलिमोद्दिन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार यांनी मानले.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                 
******                       
 

Tuesday, August 28, 2018

जिल्हा परिषदेमध्ये सदभावना दिन साजरा



उस्मानाबाद.दि.20:- जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सदभावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. कलीमोदीन शेख, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सय्यद मुजाहिद हुशेन आदीसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी (मा) संतोष माळी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदभावना प्रतिज्ञा दिली.    

Thursday, July 26, 2018

स्‍वच्‍छ सर्व्‍हेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये होणार सर्व्‍हेक्षण



उस्मानाबाद.दि.25:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दिनांक 13 जुलै 2018 रोजी “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण दिनांक 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्‍यांना तसेच जिल्ह्यांना  राष्‍ट्रीयस्‍तरावरुन दिनांक 2 आक्टोबर या गांधी जयंतीच्या दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व्‍हेक्षणासाठी राज्‍यातील प्रत्‍येक जिल्‍हयातील 10 ते 16 ग्रामपंचायतींची निवड केंद्र शासनाकडून रॅन्‍डमली पध्‍दतीने केली जाणार असल्‍याने जिल्‍हयातील सर्वच ग्रामपंचायतींना सदर सर्व्‍हेक्षणासाठी सज्‍ज रहावे लागणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिली आहे.
                केंद्र सरकार कडून निवडलेल्‍या संस्थेकडून पहिल्‍या टप्‍यामध्‍ये सार्वजनिक ठिकाणाचे थेट निरिक्षण होणार आहे. यामध्‍ये शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सर्व प्रार्थना स्‍थळे/मंदिर ठिकाण, यात्रास्‍थळे, बाजाराची ठिकाणे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विविध  सार्वजनिक ठिकाणे इत्यादी स्थळांचे सर्वेक्षण केले जाणार. तसेच या सर्वेक्षणातंर्गत ग्रामीण भागातील नागरीकांच्‍या स्वच्छतेबाबतच्‍या व स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) बाबतच्‍या प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रियाही घेण्‍यात येणार आहेत.
                स्वच्छ सर्वेक्षण - ग्रामीण 2018 अंतर्गत गावस्‍तरावर गावचे सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही,  ग्रामपंचायत सदस्‍य, निगराणी समिती सदस्‍य, अंगणवाडी कार्यकर्त्‍या, आशा आणि शिक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. यासोबतच प्रत्येकी 10 सामान्य नागरीक तसेच सामुहिक बैठकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वेक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत झालेले सर्वेक्षणाची आकडेवारी ग्राह्य धरली जाईल. आतापर्यंत बांधलेल्या आणि वापरात असलेल्या शौचालयांची माहिती घेतली जाईल.
अशी ठरेल जिल्ह्यांची क्रमवारी
                उत्तम गुणवत्तापूर्ण कामगिरी केलेल्या जिल्ह्यांची क्रमवारी ठरविण्यासाठी मंत्रालयाने एकात्मक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) विकसीत केली आहे.  या माध्यामातून 35 टक्के प्रत्यक्ष स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया, 35 टक्के उपयोगात येणाऱ्या सेवांची प्रगती,  30 टक्के प्रत्यक्ष पाहणी  केली जाईल.
  आयएमआयएस प्रणालीतंर्गत उपयोगात येणाऱ्या सेवांमध्ये “स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण” अंतर्गत  स्वच्छतेसाठी निवडलेले गावे,  हगणदारी मुक्त गावांची स्थिती,  हगणदारी मुक्त गावांची पडताळणी,  जुन्या पडक्या शौचालयाचे नव्याने बांधकामांची पाहणी केली  जाईल.
प्रत्यक्ष पाहणी माहितीतंर्गत सरकारी शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन शौचालय सुविधा, वापरात असणारे शौचालय, शौचालयाची स्वच्छता, कचऱ्याचे व्यवस्थापन, या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची स्वच्छता यासर्व बाबींचा  विचार केला जाईल.
प्रत्यक्ष स्थानिक नागारिकांची प्रतिक्रिया उपक्रमातंर्गत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्याआधारे माहिती  गोळा केली जाईल. यातंर्गत स्वच्छताग्रही खुली बैठक, व्यक्तीगत मुलाखती, सामूहिक चर्चा करून प्रतिक्रिया घेण्यात येईल. गावाची पाहणी केली जाईल, यामध्ये गावाची स्वच्छता, घन तसेच द्रव्य कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी गावपातळीवर राबविण्यात आलेला नावीन्यपूर्ण उपक्रम याची पाहणी केली जाईल. स्थानिक नागरिकांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रीया नोंदविली जाईल, यामध्ये अभियानाबाबत लोकांमध्ये असणारी जागृकता, स्वच्छ भारत मिशन बद्दलची प्रतिक्रिया, घन व द्रव्य कचरा व्यवस्थापनाचे स्थानिक पुढाकाराने  वापरण्यात आलेले सुरक्षित उपाययोजनेची नोंद घेतली जाईल. याशिवाय गावातील प्रभावी लोकांना भेटून त्यांची अभियानाबाबतची प्रतिक्रिया, गावातील घन आणि द्रव्य कचरा व्यवस्थापन याबाबतची काही नवीन माहिती असल्यास गोळा केली जाईल.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांनी शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद



उस्मानाबाद.दि.19:- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेस जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भेट देऊन शेळीपालन प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
यावेळी प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षक श्री विकास गोफणे, जीवनज्योती सरपाळे, कलीम शेख, श्री. नंदकिशोर सुरवसे, श्री. गणेश गवळी, अवधूत पौळ आदींची उपस्थिती होती.  
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या जिल्ह्याची ओळख सांगणारी उस्मानाबादी प्रजातीची शेळी घराघरांमध्ये वाढवा व आपल्या जिल्ह्याची ओळख इतरांना सकारात्मक रीतीने कृतीतून दाखवा, असे आवाहन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करत असताना प्रशिक्षण संस्थेतून आम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन, आत्मविश्वास, महामंडळाची माहिती, बँकेच्या विविध योजना, शेळीपालन कसे करावे, चारा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेळ्यांचा विमा, लसीकरण, गोठा बांधणी याचबरोबर बँकेचे कर्ज कसे घ्यावे व त्याची परतफेड कशी करावी, कर्जासाठी लागणारी कागदपत्र याविषयी माहिती मिळाली, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक श्री. विकास गोफणे यांनी केले तर आभार जीवन ज्योती सरपाळे यांनी मानले. यावेळी 24 प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.

Wednesday, July 18, 2018

“मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ




उस्मानाबाद.दि.16:- विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते सोमवार दि. 16 जून 2018 रोजी बाळास लस देऊन करण्यात आला.
                यावेळी सरपंच श्रीमती. महानंदाताई चौगुले, उपसरपंच जयसिंह पाटील, जिल्हा प्रजनन व बाल विकास अधिकारी डॉ. एस.डी. चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम.मेंढेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरी, प्रशांत वीर, ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबर, श्रीमती. पपिता कुदळे, सुनिल माळी, दादासाहेब गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किरण गरड, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक आप्पासाहेब सोनवणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (प्र)अर्जुन लाकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरोदर माता व बालकासाठी दि. 16 जून 2018 पासून विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम जिल्ह्यातील 488 गावामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांच्या लसीकरणासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत नियमित लसीकरणास पात्र असलेली बालके, नुकतीच जन्मलेली बालके आणि धनुर्वाताचे इंजेक्शन न घेतलेल्या गरोदर माता यांच्यासाठी ही अति विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 16 ते 23 जुलै 2018 मध्ये पहिला टप्पा, दि. 13 ते 20 ऑगस्ट 2018 दुसरा टप्पा तर दि. 10 ते 17 सप्टेंबर 2018 मध्ये तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील 11 हजार 679 बालके व 1 हजार 704 गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार असून उर्ववरीत गावामध्ये टप्प्याटप्प्याने  ही मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
                लसीकरण कालावधीत नजीकच्या आरोग्य केंद्रात याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले.
                या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.16:- प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, कारण यशाचे पहिले पाऊल म्हणजे ध्येय निश्चित करणे होय, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले
उस्मानाबाद तालुक्यातील माध्यमिक प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत विशेष प्राविण्य संपादीत केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 जुलै 2018 रोजी नगर परिषदेच्या नाटयगृहात गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समिती सभापती सौ. अर्चनाताई पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती शाम जाधव, जिल्हा परिषद सदस्य उषाताई यरकळ, मदन बारकुल, दत्तात्रय देवळकर, अभिमन्यू शितोळे, पंचायत समिती सदस्य श्रीमती. अर्चनाताई शिन्दे, श्रीमती.चांदणे, कुसुमताई इंगळे, विराट पाटील, संजय लोखंडे, मोहन साबळे, अशिष नाईकल, बाजीराव पवार, प्रदिप शिन्दे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, गट विकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षणाधिकारी श्री. मोकाशे, नितीन शेरखाने  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
                यावेळी पुढे बोलताना आमदार श्री. पाटील म्हणाले की, शिक्षणात दहावी, बारावीचा टप्पा म्हत्वाचा असून यानंतर पुढे काय करायचे यासाठी आई वडील, शिक्षक यांचे मार्गदर्शन बहुमुल्यअसल्याने त्यानुसार ध्येय निश्चित करावे. जीवनात कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांना विसरु नये. स्पर्धेच्या युगात मुलांनी यश संपादन करण्यावर लक्ष दिले पाहिजे. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवले पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार असून 210 शाळांना डिजिटल बोर्ड , प्रत्येक वर्गात टि.व्ही.संच बसविण्यात येणार असून चांगल्या शिक्षकांचे जिल्ह्यातील अन्य शाळात या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील सर्व  विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बुट, मोजे देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून विशेष तरतूद करण्यात आली आहे.
                विद्यार्थ्यांनी आपली क्षमता, आवड निवड ओळखून पुढचा मार्ग निवडला पाहिजे, जिल्हा परिषद शाळांची शंभर टक्के गुणवत्ता कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी यावेळी सांगितले.
                तालुक्यातील इयत्ता 12 वीच्या 8 विद्यार्थ्यांचा तर इयत्ता 10 वीच्या 265 विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी श्री.मोकासे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री.लाटे, सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****