Monday, February 4, 2019

महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करताना इतर महिलांना प्रेरणा देणे आवश्यक - आमदार राणाजगजितसिंह पाटील






उस्‍मानाबाद, दि.4:- महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करताना इतर महिलांना प्रेरणा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व लेडीज क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आद्या हिरकणी महोत्सव व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2019  कार्यक्रमाचे आयोजन लेडीज क्लब, उस्मानाबाद येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील,जिल्हा परिषद सदस्य सौ.अस्मिता कांबळे, पंचायत समिती लोहारा सभापती अश्विनी पाटील, उस्मानाबाद पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती श्याम जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख,  जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) डॉ.बलवीर मुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मॉसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना आमदार श्री.पाटील म्हणाले, आपण आपल्या यशानंतर इतरांनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच ग्रामीण भागात कुणावर अन्याय होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी बचत गटांच्या महिलांनी संघटीतरित्या अन्यायाच्या विरोद्धात उभे राहायला पाहिजे. त्याचबरोबर गावपातळीवर दारुबंदी व व्यसनमुक्तीसाठी महिलांनी प्रयत्न केले पाहीजेत, त्यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील.
 जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची विक्री मोठ मोठया शहरात होत आहे ही अभिमानाची बाब आहे. बचत गटांच्या उत्पादन केलेल्या वस्तूंचा एक ब्रँड तयार होणे अपेक्षीत आहे.त्यासाठी सदर वस्तुंच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार व्हावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी, महिलांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले, ग्रामीण भागातील कुटुंबाचा अर्धा खर्च कर्मकांडासाठी होतो, यासाठी अंद्धश्रद्धेला बगल देऊन महिलानी बचत गटांच्या माध्यमातून सक्षम होऊन कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावला पाहिजे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे ही विशेष लक्ष दिले पाहीजे, त्यासाठी त्यांनी शौच्छालयाचा नियमित वापर केला पाहीजे.
डॉ.कोलते यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात 11 हजार स्वयंसहाय्यता गटांची बांधणी पूर्ण झाली असून त्यात एक लाख 30 हजार कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील महिला बचत गटाची सदस्य होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील, सहा ते सात हजार गटांना आर्थिक सहाय्य करण्यात आले असून उर्वरीत गटांनाही सहकार्य करुन सक्रिय कशी होतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या अभियानाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना बँकाकडून अर्थसहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
यावेळी प्रास्ताविक करताना डॉ.मुंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नोती अभियान एक आशेचा आधार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीला अभियान सुरु झाले तेव्हा फक्त तीन तालुक्यात हे अभियान राबविण्यात आले, आता संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत महिलांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देणे, बँकेचे कर्ज मिळवून देणे आदी कामे करण्यात येतात. स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना व मालाला बाजारपेठ  मिळावून देण्याचे काम करण्यात येत आहे.
यावेळी जिल्ह्यातील ज्या गटांनी अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेले आहे आशा गटांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावंलंबन पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले, यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातून प्रथम प्रज्ञाशील महिला स्वयंसहाय्यता गट (उपळा), द्वितीय स्वाभिमानी महिला स्वयंसहाय्यता गट (देवळाली) तर तृतीय चांदणी महिला स्वयंसहाय्यता गट (वाघोली), उमरगा तालुक्यातून प्रथम महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (नाईक नगर), द्वितीय महाराष्ट्र नारी  महिला स्वयंसहाय्यता गट (नाईचाकूर) तर तृतीय पुरुषोत्तम महिला स्वयंसहाय्यता गट (नाईचाकूर), कळंब तालुक्यातून प्रथम साई महिला स्वयंसहाय्यता गट (कन्हेरवाडी), द्वितीय महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (वाकडी केज), तृतीय शिवपार्वती महिला स्वयंसहाय्यता गट (शिराढोण), परंडा तालुक्यातून प्रथम जय तुळजाभवानी महिला स्वयंसहाय्यता गट (इंगोंदा), द्वितीय जीवदानी माता महिला स्वयंसहाय्यता गट (लोणी) तृतीय सावित्रीबाई महिला स्वयंसहाय्यता गट (डोंजा), वाशी तालुक्यातून माऊली महिला स्वयंसहाय्यता गट (दसमेगाव), द्वितीय ग्रामसेवा महिला स्वयंसहाय्यता गट (लाखन गाव), तृतीय मोहटा देवी महिला स्वयंसहाय्यता गट (सेलू), लोहारा तालुक्यातून प्रथम सिध्दार्थ महिला स्वयंसहाय्यता गट (धानुरी), द्वितीय लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता गट (धानुरी), तृतीय रेणूका महिला स्वयंसहाय्यता गट (हिप्परगा), भूम तालुक्यातून राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय महिला स्वयंसहाय्यता गट (आंबी), द्वितीय राधिका महिला स्वयंसहाय्यता गट (सोनेवाडी), तृतीय श्री. शिवशक्ती महिला स्वयंसहाय्यता गट (नागेवाडी), तुळजापूर तालुक्यातून प्रथम क्रांती महिला स्वयंसहाय्यता गट (सांगवी का), द्वितीय वसुंधरा महिला स्वयंसहाय्यता गट (पिंपळा बुद्रुक) तर तृतीय ज्योती महिला स्वयंसहाय्यता गट (तीर्थ बुद्रुक) ला देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, बचत गटाच्या सदस्य पाकीजा शेख, रुपाली श्न्दिे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रमाकांत गायकवाड यांनी केले. या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूचे 107 स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
                                                        *****

Sunday, December 23, 2018

ग्रंथदिंडीने वेधले उस्मानाबादकरांचे लक्ष




उस्मानाबाद, दि.22:-  पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद येथे कन्या प्रशाला ते वैराग्यमहामेरू संत गोरोबाकाका साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत महापुरुषांच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा प्रारंभ करण्यात आला. याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा तथा स्वागताध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
टाळ, मृदंगाचा गजर करणारे पथक, विविध वेशभूषातील विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले. या शिवाय विद्यार्थ्यांनी या दिंडीत विविध जनजागृतीपर घोषणा देत सामाजिक संदेश देण्याचे काम केले. यावेळी दिंडीत संतपरंपरा, उस्मानाबाद जिल्हा दर्शन, एकता बल, स्वच्छता मिशन, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण संस्कृती, आदी संदेश देणारे चित्ररथ सामिल करण्यात आले होते. ही दिंडी जिल्हा परिषद कन्या शाळेपासून संत गाडगेबाबा चौक, काळा मारूती चौक, ताजमहल टॉकीज, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे संमेलनस्थळी आली. यावेळी तेथे दिंडीचा समारेाप करण्यात आला.

मन सुदृढ करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे -आमदार राणाजगजितसिंह पाटील




उस्मानाबाद, दि.22:-मन सुदृढ करायचे असेल तर साहित्य महत्वाचे आहे, जग कसे आहे, चांगले काय आहे, हे साहित्यामुळे समजते. त्यामुळे जीवनात साहित्याचे स्थान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी येथे केले.
             जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्या बालकुमार साहित्य्‍ संमेलनाचे उद्‌घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते कन्या प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. यावेळी पु. . देशपांडे विचारमंचावर जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागताध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, संमेलन अध्यक्ष कु.साक्षी तिगाडे, जेष्ठ साहित्य‍िक भास्कर चंदनशिव, राजेंद्र अत्रे, माधव गरड, बालाजी इंगळे, निर्मला मठपती, कमलताई नलावडे, रमेश चिल्ले, आशा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय देवळकर, संदिप मडके, ज्ञानेश्वर गीते, अस्मिता कांबळे, उषाताई यरकळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी चंदनशिवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रोहिणी कुंभार, डायटचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख,  उपशिक्षणाधिकारी कादर शेख आदीसह सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी तसेच जिल्हयातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. 
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की,  मुलांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी त्यांना साहित्य संमेलनासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या संमेलनाच्या निमित्ताने शाळांमधूनच विद्यार्थ्यांना साहित्याचा अनुभव मिळणार आहे. साहित्य म्हणजे मनोरंजन नसून जीवन कसे चांगल्या पध्दतीने जगायचे हे साहित्य शिकवत असते.
ज्या शाळेतील मुलांची या संमेलनात निवड झाली आहे त्या शाळेला पाच हजार रुपयांचा पुस्तकांचा संच देण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
जेष्ठ साहित्यीक भास्कर चंदनशिव यावेळी म्हणाले की, सध्या संभ्रमाचे वातावरण असून माणूस माणसापासून दूरावतो आहे, अशा परिस्थितीत साहित्य  संमेलन आयोजन करणे ही काळाची गरज आहे. माणसाला माणूसकीप्रत घेऊन जाणारा मार्ग म्हणजे साहित्य होय. साहित्य हा माणसाला माणसात आणणारा व्यवहार आहे. आई ही पहिली बालसाहित्य‍िक आहे ती लहान मुलांच्या रडण्या, बागडण्यापासून ते अंगाई गीतापर्यंत साहीत्य निर्माण करते. मुलांना व्यक्त होण्याची संधी या संमेलनामुळे मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक वेगळे व्यासपीठ यामुळे उपलब्ध झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दिव्यांगांना तालुकास्तरावर अपंग प्रमाणपत्राचे वाटप, आदीसह विविध अभिनव उपक्रम राबवून ऐतिहासीक निर्णय घेणारी राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. यापुढेही शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार असून शिक्षकांनी ही ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, तांडा, वस्ती  शाळेतील मुलांचे उपजत गुण शोधण्यासाठी त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागूण शोधून त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी संमेलनाचे आयोजन केले आहे.  सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची ताकद साहित्यात असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गरुड झेप घ्यावी, त्याचबरोबर एखादे शिल्पचित्र  रेखाटले तर त्यातून मिळणारा आनंद द्विगुणीत अनुभव यावा, कल्पना शक्तीला फुलविण्याची ताकद साहित्यात असते.
तांडा, वस्तीवरील गरिब मुलांचे भवितव्य हे त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी हे साहित्य संमेलन असून बाल साहित्यातून त्यांना काय पाहिजे हे मांडता यावे यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपाध्यक्षा तथा संमेलन स्वागत अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संमेलनाध्यक्ष कुमारी साक्षी तिगाडे म्हणाली की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. या बाल साहित्यातून उद़याचे कवी व लेखक घडतील. समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतील. कला कोणतीही असू द़या, तीला बाहेर येऊ द़या ती तुम्हाला मान मिळवून देईल. संमेलनातून खूप काही शिकायला मिळाले, असेही तीने सांगितले. शेतकऱ्याचे सत्य ही कविता तीने सादर केली. प्रस्तावना डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी केले. सुत्रसंचालन हणमंत पडवळ व श्रीमती संगिता वाकुरे यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी रोहिनी कुंभार यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Tuesday, October 30, 2018

ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून तुर्तास मान्यता



सुधारित प्रस्ताव पाठविण्याचे आदेश
1 कोटी 91 लाख रुपये निधीची केली होती शासनाकडे मागणी
शासनाकडून वीज बिल थकबाकी व सोलर प्लाँटचा समावेश करण्याबाबत सुचना

उस्मानाबाद,दि.25:-  तालुक्यातील तेर, ढोकी, कसबे तडवळा, ऐडशी या चार गावाला  पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद पडली होती, ही योजना सुरू करणेसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वारंवार प्रयत्न करण्यात येत होते, दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  तंत्रीक समितीचे बैठक झाली या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांतच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत शासनाच्या वतीने माहिती मागविण्यात आली होती, त्या अनुषंगाने दि. 4 ऑगस्ट 2018 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांनी ही योजना सुरू करणेसाठी 1 कोटी 91 लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रीक समितीची बैठक झाली. या बैठकीत चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून तुर्तास योजना सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या अनुषंगाने सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करणेच्या सुचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही योजना सुरू होण्यास अंतीम मान्याता लवकरच मिळणार असल्याने चार गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
         उस्मानाबाद तालुक्यातील ढोकीसह चार गावांना तेरणा मध्यम प्रकल्पातून 2006 मध्ये चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली तब्बल 16 कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली. योजनेद्वारे तेर ढोकी तडवळा ऐडशी आदी गावाला पाणीपुरवठा करण्यात आला. नंतर जुन 2015 ला धरणातील पाणीसाठा संपला त्यामुळे योजना बंद पडली नंतरच्या काळात 2016 मध्ये धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला परंतु योजनेवरील थकीत विज बिल देयकामुळे कनेक्शन तोडण्यात आली नंतर योजना पाणी असताना देखील योजना सुरू झाली नाही, दि. 16 मे रोजी शासनाने एक परिपत्रक काढले जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सार्वजणीक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके मोठ्या प्रमाणावर थकीत आहेत त्यामुळे योजना बंद पडत आहेत त्यामुळे या देयका वरील 50 टक्के रक्कम व वीज माफ करून स्थानिक स्वराज्य संस्थाला मिळणाऱ्या 14 व्या वित आयोगाच्या निधीतून थकीत वीज बिल भरण्याची परवानगी देण्यात आली. नंतर उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रायते यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला चार गावाला मिळणारा 14 व्या वित आयोगाच्या निधीतून ऊर्जा विभागाला 50 टक्के विज बिलाचे थकीत रक्कम वर्ग करून घेण्यात यावे असे पत्र पाठवून दिले व दि.4 ऑगस्ट 2018 ला चार गावातील पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी साठी (नविन जलकुंभ बांधकाम करणे, नविन वॉल्ह टाकणे, नविन पाईपलाइन टाकण्या साठी असे विविध कामांसाठी 1 कोटी 91 लाख रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागांकडे जिल्हा परिषदेच्या वतीने पाठवण्यात आला होता. या संदर्भात दि. 8 आक्टोबर 2018 रोजी झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्यात तुर्तास मान्यता दिली आहे या अनुषंगाने सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे सुचनाही दिल्या आहेत.
"बैठकीत झालेल्या चर्चे व घेण्यात आलेली निर्णय"
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत परिशिष्ट ब मध्ये समाविष्ट केलेल्या 83 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी पुनरूज्जिवीत  करावयाच्या योजनांचा व समाविष्ट नाहीत मात्र पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे अशा सर्व योजनांचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी व चार गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवीत करण्याबाबत खालील अटींच्या अधीन राहून मंजुरी देण्यात आली - प्रस्तावित योजनेत समाविष्ट सर्व गावातील लाभार्थ्यांकडुन हमीपत्र घेण्यात यावे, हमीपत्र दिल्यानंतरही एखाद्या गावाने पाणी घेण्यासाठी नकार दिला तरी त्यांच्या कडून 75 टक्के पाणी पट्टी वसुल करण्यात यावी. याबाबत ग्रामस्थांना निविदा प्रक्रिया करण्या आगोदरच कल्पना देण्यात यावी, सदरील योजनांवर सोलार पॅलेटचा व बल्क मीटारचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या अंदाजपत्रकात MSEB च्या थकीत वीज बिलाचा समावेश करण्यात यावा, योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे तातडीने सादर करण्यात यावे, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उस्मानाबाद यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत या संदर्भात बैठकीत योजना सुरू करणेसाठी अखेरचे मान्यता मिळणार आहे.  
ढोकी व चार गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून तुर्तास मान्यता मिळाली आहे. सुधारीत अंदाजपत्रक यामध्ये 1 कोटी 54 लक्ष रूपयांचे सोलार पॅलेटचा व बल्क मीटरचा समावेश करण्यात आला तसेच MSEB चे थकीत विज बिल 88.21 लक्ष असे नव्याने समावेश करण्यात आला आहे. पुर्वीचा व आताचा असा मिळून चार कोटी 43 लक्ष रुपयेची सुधारीत अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. काही दिवसांतच पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अखेरची मान्यता मिळेल. यामुळे मुख्यता वीज बिलामुळे बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुधारित धोरणामुळे कार्यान्वयीत होणार आहे.
*****



जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूरी बंधारे दुरुस्तीसाठी 30 कोटी रुपये मंजूर



उस्मानाबाद.दि.24:- जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या भौगोलीक परिस्थीतीचा विचार करुन माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापुर पध्दतीचे बंधारे बांधले होते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमी असल्यामुळे तसेच जिल्ह्यातून एकही मोठी नदी जात नसल्यामुळे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कोल्हापूर पध्दतीचे 1022 बंधारे, 513 पाझर तलाव व 126 साठवण तलाव बांधले होते. जलसंवर्धनाचे महत्व लक्षात घेवून जलयुक्त शिवार करण्यासाठी त्यावेळीच डॉ. साहेबांच्या दुरदृष्टी नेतृत्वाने कामे पूर्ण केली होती. परंतु त्यावेळी लोकांना याचे महत्व न कळल्यामुळे या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष केले. हे बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदे मार्फत याचा दोन अभियंत्यामार्फत सर्व्हे करण्यात आला व यासाठी करावयाच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला व त्यानुसार निधी उपलब्ध करावा म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या कडे निधीची मागणी करण्यात आली होती. या निधीच्या उपलब्धतेमुळे कोल्हापूरी बंधाऱ्याची स्थापत्य दुरुस्ती, गेट दुरुस्ती व नवीन गेट खरेदी आदी कामे करण्यात येणार असून यामुळे 96 हजार 874 स.घ.मी. इतका पाणीसाठा पुनर्स्थापित होऊन सुमारे 30 हजार 112 हेक्टर इतके क्षेत्र सिंचन पुनर्स्थापित होणार आहे.
जिल्ह्यातील ही मोलाची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी पूर्ण क्षमतेने उपयोगात नव्हती. यातील बहुतांश बंधारे किरकोळ दुरुस्तीमुळे वापरात नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यांची आजची किंमत गृहीत धरल्यास शासनाची जवळपास 250 कोटीं पेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंधारण मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री, केंद्रीय अधिकाऱ्यांची पथके यांच्याकडे करण्यात येत होती. विधी मंडळात देखील अनेकवेळा निधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती.
निती आयोगाने निवडलेल्या जिल्ह्यामध्ये उस्मानाबादचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या मार्फत बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. निती आयोगाच्या निकषाप्रमाणे कृषि व जलसंधारणाच्या निर्देशकांची पुर्तता करण्यासाठी बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास किरकोळ दुरुस्ती अभावी वापरात नसलेली करोडो रुपयांची मालमत्ता उपयोगात येवून  सिंचन क्षमतेत वाढ होईल. त्यामुळे यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जि. प. उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांच्याकडे केली होती. तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील व उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.
या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाय योजनांचा विशेष कार्यक्रम 2018 अंतर्गत सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 983 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून रु. 30 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जलसंधारणमंत्री यांचे विशेष आभार मानले आहेत. 
*****

Tuesday, September 25, 2018

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन



उस्मानाबाद.दि.25:- जिल्हा परिषदेमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मधुकर देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेटे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.कवडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव, उपशिक्षणाधिकारी श्रीमती.रोहीणी कुंभार आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                             ******

Friday, September 7, 2018

समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात -आमदार राणाजगजितसिंह पाटील



उस्मानाबाद.दि.5:- गावच्या विकासासाठी एकजूट व लोकसहभाग म्हत्त्वाचा असल्याने लोकसहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. समाजाला दिशा देण्याचे व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येथे केले. 
 शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात बुधवार दि. 5 सप्टेंबर 2018 रोजी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पंचायत समिती सभापती (उस्मानाबाद) बालाजी गावडे, पंचायत समिती सभापती (कळंब) दत्तात्रय साळूंके, पंचायत समिती सभापती (वाशी) श्रीमती. भाग्यश्री हाके, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गीते, उध्दव साळवी, दत्तात्रय देवळकर, वैभव मुंढे, मदन बारकुल, महेंद्र धुरगुडे, सुरेश कोरे, उषाताई यरकळ, अस्मिता कांबळे, जयश्री खंडागळे, सुनिता जाधव, प्रविण खटाळ, शिक्षणाधिकारी (प्रा.) कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी (मा) शिवाजी चंदनशिवे, उपशिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. शिक्षकांनी मोठया प्रमाणात लोकसहभागातून शाळा सुधारल्या आहेत त्याच बरोबर गावाचा देखील कायापालट केला आहे. त्यामुळे प्रत्येक कामात शिक्षकांची साथ महत्त्वाची आहे. लोकसहभाग गावात वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सीएसआरच्या माध्यमातून शिक्षणासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, आपण केलेल्या कामाचे मुल्यमापण व्हावे, कौतूक व्हावे म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून काम करावे, अशी आशा जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांनी व्यक्त करुन  शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी संख्या वाढली आहे, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ.अर्चनाताई पाटील बोलतांना म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी मोठया प्रमाणात जिल्हा परिषदेच्या सेस मधून निधीची तरतूदही करण्यात येत आहेत. डिजिटल शाळा, आरओ प्लाँट, शाळेसाठी गॅस सर्व विद्यार्थ्यांना गणवेष, बुट, सॉक्स आदी उपक्रम राबवून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील वर्षीपेक्षा जिल्हा परिषद शाळांची यावर्षी 12 हजार विद्यार्थी पटसंख्या वाढ झालेली आहे. त्याचबरोबर क्वशन बँक तयार करुन सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यावर्षी पासून विद्यार्थ्यांसाठी 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये शिष्यवृत्ती ही देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत वीज बिलासाठी ही जि.प.सेस मधून 89 लाख रुपयांची तरतूद आगामी जि.प.सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात येईल. शिक्षण विभागात महाराष्ट्रात अव्वलस्थानी जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी यावेळी सांगितले.  
कांबळे अरुण नरहरी, फुलमामडी तौफी कुलआलम नुरुलअलीन, स्वामी रंजना कमलाकर, गायकवाड कमलाकर शामराव, खोसे उमेश रघुनाथ, देशमाने विजयकुमार गुरुनाथ, कांबळे तानाजी आप्पाराव, कांबळे सुब्राव गोरोबा, पखाले नामदेव भागवत, गादेकर विनोद भागवत, वाघोलीकर अभय शंकरराव, भोसले विजयकुमार बाबासाहेब, कांबळे तात्याबा बाबा, अंधारे अमोल रावसाहेब, बन बळीराम आदी 15 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कारांने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अमोल अंधारे, उमेश खोसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी कलिमोद्दिन शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी श्रीमती. रोहीणी कुंभार यांनी मानले.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.                 
******