उस्मानाबाद.दि.16:- विस्तारीत
ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत “अति
विशेष मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण
मोहिमेचा उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा
आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते
यांच्या हस्ते सोमवार दि. 16 जून 2018 रोजी बाळास लस देऊन करण्यात आला.
यावेळी सरपंच श्रीमती. महानंदाताई चौगुले, उपसरपंच
जयसिंह पाटील, जिल्हा प्रजनन व बाल विकास अधिकारी डॉ. एस.डी. चव्हाण, तालुका
आरोग्य अधिकारी डॉ.डी.एम.मेंढेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरी, प्रशांत वीर,
ग्रामपंचायत सदस्य अनंत खोबर, श्रीमती. पपिता कुदळे, सुनिल माळी, दादासाहेब
गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किरण गरड, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक
आप्पासाहेब सोनवणे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (प्र)अर्जुन लाकाळ आदींची
प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरोदर माता व
बालकासाठी दि. 16 जून 2018 पासून “विस्तारीत
ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत अति विशेष मिशन इंद्रधनुष्य” लसीकरण मोहिम जिल्ह्यातील 488 गावामध्ये राबविण्यात येत आहे.
यामध्ये जिल्ह्यातील शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके आणि गरोदर मातांच्या
लसीकरणासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेत नियमित लसीकरणास
पात्र असलेली बालके, नुकतीच जन्मलेली बालके आणि धनुर्वाताचे इंजेक्शन न घेतलेल्या
गरोदर माता यांच्यासाठी ही “अति
विशेष मिशन इंद्रधनुष्य” मोहिम
राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात दि. 16 ते 23 जुलै 2018 मध्ये पहिला टप्पा, दि. 13
ते 20 ऑगस्ट 2018 दुसरा टप्पा तर दि. 10 ते 17 सप्टेंबर 2018 मध्ये तिसऱ्या
टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शुन्य ते दोन वर्षे वयोगटातील 11
हजार 679 बालके व 1 हजार 704 गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार असून उर्ववरीत
गावामध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहिम
राबवून शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.
लसीकरण कालावधीत नजीकच्या आरोग्य केंद्रात याचा
लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,
उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, आशा
स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment