Wednesday, July 11, 2018

सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या वाढीव कुटूंबाचे शौचालयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण



उस्मानाबाद.दि.11:- स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत सन 2012 च्या पायाभुत सर्वेक्षणामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या वाढीव कुटूंबाचे शौचालयाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या वतीने माहिती संकलनाकरीता प्रपत्र (अ) व (ब) पंचायत समिती व गाव पातळीवर उपलब्ध करुन देण्यात आलेले ओहत. सदरील सर्वेक्षण हे स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने अंतिम सर्वेक्षण असल्याने यात सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अचूक व वेळेत माहिती देणे करीता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.
            स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2012 मध्ये शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटूंबाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आलेले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे उस्मानाबाद जिल्हा हा दि. 30 डिसेंबर 2017 रोजी हागणदारी मुक्त केला आहे. तथापी 2012 च्या सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या कुटूंबाची नोंद शासन दप्तरी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शासनाने सर्वेक्षणाव्यतिरिक्त वाढलेल्या कुटूंबांची माहिती संकलित करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबत जि.प. अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यात सर्व प्रथमत: या बाबत महाराष्ट्र शासनाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव कुटूंबाच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. त्या प्रमाणे दिनांक 18 जून 2018 रोजी सर्व गट विकास अधिकारी यांना पत्रान्वये प्रपत्र (अ) व (ब) वाढीव कुटूंबाची माहिती देण्याकरीता सूचित करण्यात आलेले आहे.
            यात शौचालय असलेल्या व नसलेल्या कुटूंबाची माहिती, सन 2012 च्या पायाभूत सर्वेक्षणामध्ये शौचालय नसताना आहे असे नमुद झालेल्या कुटूंबाची माहिती, अल्प-भू-धारक किंवा भूमिहीन असताना बहु-भू-धारक अशी नोंद झालेल्या कुटूंबांची यादी संकलित केली जाणार आहे.
******


No comments:

Post a Comment